अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले प्रश्नसंच – तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा!
सराव परीक्षा निवडा
महाराष्ट्र SSC बोर्ड परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी नियमित व योग्यरीत्या सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त अभ्यास पुरेसा नसतो; खर्या बोर्डसारखे पेपर सोडविल्याने विद्यार्थी वास्तविक परीक्षेचा अनुभव घेतात आणि परीक्षेची तयारी अधिक मजबूत होते.
योग्य प्रकारे सराव करणारा विद्यार्थी नेहमीच स्पर्धेत पुढे असतो – आणि Score More चे VVIMP सराव प्रश्नसंच हेच उद्दिष्ट लक्षात घेऊन तयार केलेले आहेत.
100% बोर्ड पॅटर्ननुसार सराव संच
मागील प्रश्नपत्रिका, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, आणि जास्त गुण असलेले धडे यांचा सखोल अभ्यास करून या संचात अतिमहत्त्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत.
परीक्षेत गुण मिळवण्यासाठी उत्तरलेखन शैली अत्यंत महत्त्वाची असते. या संचामध्ये प्रश्नांना गुण मिळवण्यासाठी मुद्देसूद विषयातील कोणताही प्रश्न विविध प्रकारे विचारला तरी त्याचे उत्तर कसे लिहावे ते समजते
सराव पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थी निश्चित वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. त्यामुळे लेखनाचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो.
प्रत्येक विषयातील सर्व धडे पूर्णपणे समाविष्ट करून, सोपे–मध्यम–कठीण अशा संतुलित पद्धतीने प्रश्नांची रचना केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची विषयाची पूर्ण तयारी होते.
सराव संच सोडवल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे गुणांकन करू शकतात. त्यामुळे कोणत्या धड्यात कमकुवत आहात, कोणत्या प्रकारच्या चुका होत आहेत, आणि कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्ट जाणून घेता येते.
अनुभवसंपन्न शिक्षक, विषयतज्ज्ञ यांचा सहभाग असल्यामुळे Score More चे सराव संच हे पूर्णपणे विश्वासार्ह, अचूक आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त ठरतात.